काय हल्ली चाललंय, देव जाणे,माझ्या patience ची अगदी कसोटी आहे.delivery नंतर सोनल फार sensitive आणि possesive झाली आहे.परवा हे tight होउन आलेलंही तिला मुळीच आवडलेलं नाही..तेव्हाही ती जरा upset झाली होती..शनिवारी संध्याकाळभर पिल्लू फार कुरकुर करत होतं..त्याच्या रडण्यानेही ती बेजार झालेली होती......हे बाळाला घेऊन फिरवत होते..
तिने बोलावलं,म्हणून ते त्याला वर तिच्या खोलीत घेऊन गेले..पाठोपाठ मी ही गेले..त्यांच्यात नक्की काय संभाषण झालं, माहीत नाही,पण ती चिडून त्यांना काही बोलली, हे मी ओझरतं ऐकलं.त्यांचा चेहरा एकदम पडला..........
मी चटकन् बाळाला त्यांच्याकडून घेतलं,आणि त्यांच्या पाठीवर थोपटून cool म्हंटलं..बाळाला फीड करायचं होतं..मी जरा गप्पच होते......
ते आटपल्यावर मी खाली आले..सर्वाना भूक लागली होती,म्हणून म्हंटलं, आहेत त्यांची जेवणे करून घ्यावीत.....
आई,मिनल आणि हे यांची पानं घेतली..हे भडकलेले होते,अपमानित ही होते.....त्यांची बडबड सुरु झाली.....
आई गप्प,मिनल रडवेला......हे काही केल्या थांबेनात..मलाही काही सुचेना.......
तिला ऐकू गेल्यावर तिनेही ओरडाआरडा केलान्..मिनललाही ती आवरेना..
कसंबसं सगळ्यांना चुचकारून झोपायला पाठवलं........रात्र कशी ती संपेना.!!
रविवार असाच मौनात गेला..ती लहान म्हणून,ते मोठे म्हणून..कोणी माघार घ्यायला तयार नाही..
आज सकाळी मिनल बेलापूरला गेला..ती जरा शांत झालीय, पण हे तसेच, अस्वस्थ.....मगाशी तिने त्यांना sorry म्हंटलंय..
आता बघू,हे कधी निवळतायत !! तोपर्यंत माझ्या डोक्याचा भुगा..!!
Monday, April 30, 2007
Friday, April 27, 2007
युध्दाचा प्रसंग..
सकाळी जाऊन उठवलं,तर चेहरा एकदम ताजातवाना होता...झोप लागली होती तर चांगली !
चहा-नाश्त्यानंतर स्वारी तयार होऊनच खाली आली..अरे हो,चंद्रकांतच्या मुलीच्या लग्नाला जायचं होतं नाही का!
पण सोनल एकदम नाराज झाली..आई,बाळाचे कान टोचायचेत ना गं!..
म्हटलं,हो बेटा,मी आहे ना !! (मी आहेच हातचा एक! )
सिन्नरला निघाले होते,चंद्रकांत वरंदळ कडे..खरं तर त्या लोकांच्यात गेले की मला काळजीच वाटत राहते..
एकूण,त्या राजकारणी लोकांची नावड आणि भीतीच आहे मला!!
त्यांच्यात बसून गप्पा,पिणं झालं की,नको-नको होतं...
साडेसातला घरी आले..एकदम टेट!!
शी....celebration लाही दारु प्यायची,मर्तिकालाही,आणि बिदाईलाही!!!!
तर,गाडी नीटपणे आणली घरी.... ....कसेबसे गाडीतून उतरले...
घरात आई होती,कसं वाटलं असतं तिला...मग त्यांना बाहेरच गाठलं..
म्हंटलं,अहो,जास्त घेतलीत? आता सरळ वरती जा हं...मी येते खोलीत,मग बोलू......
बाईंचा स्वयंपाक सुरु होता..आई टीव्ही बघत होती...सोनल तिच्या खोलीत......
मग सरळ वर गेले...महाराजांना गच्चीत घेऊन गेले..खुर्च्या टाकून बसलो..थंडगार पाणी दिलं..
चेहर्यावर दिसतच होतं,मनात विचारांचा कल्लोळ चालू होता..
हं.कोण कोण भेटलं तिथे?
उत्तर देण्याऐवजी त्यांना रडूच फुटलं..हेही नेहमीचंच !
सुषा,तुझ्याशिवाय कोणीच नाहिये मला,जगात !!
म्हंटलं, हो, पण काय काय झालं तिथे? लग्न कसं झालं?
ठीक झालं सगळं..पण सुषा, कंपनीची वाट लागतेय! तिथे काय चाललंय,कोणालाच माहीत नाहीये...
worker पासून ex.director पर्यंत जे सगळे भेटले,कुणालाच काहीच माहीत नाही..सगळेच पडचाकर!!
सगळे नुसते पगारापुरते तिथे!
जाउ दया ना हो, का सारखा त्रास करुन घेता?.विसरा सगळं!..
पण नाहीच.हुंदके थांबतच नव्हते..मग रडू दिलं जरा वेळ..त्याने हलकं झालं जरा..
मग आत आणलं..म्हंटलं,पडा जरासं, सावकाश मग जेवण आणते..
खाली आले तर बाई गेल्या होत्या..आई वाटच पहात होती...
तिला जरा जुजबी सांगितलं,तेवढ्यात,पुन्हा ह्यानी हाक मारली..
धावतपळत वर गेले तर म्हणाले, भूक लागलीय....
मग सारं जेवण वर नेलं,नि जेवू घातलं....
कारण,शिरीषही यायचा होता जेवायला, आई होती..कसे वागले असते,कोण जाणे!!
हे सगळं करण्यात अर्धापाउण तास माझी जी काही धावपळ नि घालमेल चालली होती,तिला काही सुमारच नव्हता..
मग शिरीष आला.....मुकाट्यानेच जेवणे उरकली.....
कसा रात्रंदिन युध्दाचा प्रसंग येतो ना..आणि वेळेला साजरा अभिनयही करावा लागतो ना!!!
चहा-नाश्त्यानंतर स्वारी तयार होऊनच खाली आली..अरे हो,चंद्रकांतच्या मुलीच्या लग्नाला जायचं होतं नाही का!
पण सोनल एकदम नाराज झाली..आई,बाळाचे कान टोचायचेत ना गं!..
म्हटलं,हो बेटा,मी आहे ना !! (मी आहेच हातचा एक! )
सिन्नरला निघाले होते,चंद्रकांत वरंदळ कडे..खरं तर त्या लोकांच्यात गेले की मला काळजीच वाटत राहते..
एकूण,त्या राजकारणी लोकांची नावड आणि भीतीच आहे मला!!
त्यांच्यात बसून गप्पा,पिणं झालं की,नको-नको होतं...
साडेसातला घरी आले..एकदम टेट!!
शी....celebration लाही दारु प्यायची,मर्तिकालाही,आणि बिदाईलाही!!!!
तर,गाडी नीटपणे आणली घरी.... ....कसेबसे गाडीतून उतरले...
घरात आई होती,कसं वाटलं असतं तिला...मग त्यांना बाहेरच गाठलं..
म्हंटलं,अहो,जास्त घेतलीत? आता सरळ वरती जा हं...मी येते खोलीत,मग बोलू......
बाईंचा स्वयंपाक सुरु होता..आई टीव्ही बघत होती...सोनल तिच्या खोलीत......
मग सरळ वर गेले...महाराजांना गच्चीत घेऊन गेले..खुर्च्या टाकून बसलो..थंडगार पाणी दिलं..
चेहर्यावर दिसतच होतं,मनात विचारांचा कल्लोळ चालू होता..
हं.कोण कोण भेटलं तिथे?
उत्तर देण्याऐवजी त्यांना रडूच फुटलं..हेही नेहमीचंच !
सुषा,तुझ्याशिवाय कोणीच नाहिये मला,जगात !!
म्हंटलं, हो, पण काय काय झालं तिथे? लग्न कसं झालं?
ठीक झालं सगळं..पण सुषा, कंपनीची वाट लागतेय! तिथे काय चाललंय,कोणालाच माहीत नाहीये...
worker पासून ex.director पर्यंत जे सगळे भेटले,कुणालाच काहीच माहीत नाही..सगळेच पडचाकर!!
सगळे नुसते पगारापुरते तिथे!
जाउ दया ना हो, का सारखा त्रास करुन घेता?.विसरा सगळं!..
पण नाहीच.हुंदके थांबतच नव्हते..मग रडू दिलं जरा वेळ..त्याने हलकं झालं जरा..
मग आत आणलं..म्हंटलं,पडा जरासं, सावकाश मग जेवण आणते..
खाली आले तर बाई गेल्या होत्या..आई वाटच पहात होती...
तिला जरा जुजबी सांगितलं,तेवढ्यात,पुन्हा ह्यानी हाक मारली..
धावतपळत वर गेले तर म्हणाले, भूक लागलीय....
मग सारं जेवण वर नेलं,नि जेवू घातलं....
कारण,शिरीषही यायचा होता जेवायला, आई होती..कसे वागले असते,कोण जाणे!!
हे सगळं करण्यात अर्धापाउण तास माझी जी काही धावपळ नि घालमेल चालली होती,तिला काही सुमारच नव्हता..
मग शिरीष आला.....मुकाट्यानेच जेवणे उरकली.....
कसा रात्रंदिन युध्दाचा प्रसंग येतो ना..आणि वेळेला साजरा अभिनयही करावा लागतो ना!!!
Thursday, April 26, 2007
सबुरी
काल रात्री पिल्लू झोपतच नव्हतं, काही केल्या!! दोन वाजून गेले होते ,
मिनूही अगदी थकून गेली होती.....शेवटी एकदा दोघेही झोपले..
मीही अंथरुणाला पाठ टेकणार,तोच फोनची रिंग वाजली..
मिनूने घेतला..आई,बाबांचा फोन..
मी घेतला,अहो,काय झालं?..
सुषा,मला झोप येत नाहीये..
घाईघाईत आमच्या खोलीत गेले..म्हंटलं,काय होतंय हो?
त्यांना झोपच लागत नव्हती..मग गोळी दिली,पाणी दिलं.
.म्हटलं,जरा कुरवाळुन,थोपटून,मग जावं झोपायला..
सुषा,प्लीज,पाठीवरुन हात फिरव ना!...एकदम आज्ञा सुटली...
हुं!! म्हणजे आता मी जे करणार,ते ह्यांच्या आज्ञेने..
मला करायचे,म्हणून नाही!!
आता त्या करण्यातली मजाच गेली...
का हे इतक्या घाईने सांगतात? का मुळीच वाट पहात नाहीत?
खाली साईबाबांना मनापासून धूपदीप करतात ना?
मग त्याना सबुरी, patience चा अर्थ का कळत नाही?
धीर धरणे का जमत नाही?
मग जरा वेळाने झोपायला गेले.......
मिनूही अगदी थकून गेली होती.....शेवटी एकदा दोघेही झोपले..
मीही अंथरुणाला पाठ टेकणार,तोच फोनची रिंग वाजली..
मिनूने घेतला..आई,बाबांचा फोन..
मी घेतला,अहो,काय झालं?..
सुषा,मला झोप येत नाहीये..
घाईघाईत आमच्या खोलीत गेले..म्हंटलं,काय होतंय हो?
त्यांना झोपच लागत नव्हती..मग गोळी दिली,पाणी दिलं.
.म्हटलं,जरा कुरवाळुन,थोपटून,मग जावं झोपायला..
सुषा,प्लीज,पाठीवरुन हात फिरव ना!...एकदम आज्ञा सुटली...
हुं!! म्हणजे आता मी जे करणार,ते ह्यांच्या आज्ञेने..
मला करायचे,म्हणून नाही!!
आता त्या करण्यातली मजाच गेली...
का हे इतक्या घाईने सांगतात? का मुळीच वाट पहात नाहीत?
खाली साईबाबांना मनापासून धूपदीप करतात ना?
मग त्याना सबुरी, patience चा अर्थ का कळत नाही?
धीर धरणे का जमत नाही?
मग जरा वेळाने झोपायला गेले.......
Subscribe to:
Posts (Atom)